JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कष्ट केले की दिवस पालटतातच...' दिग्दर्शक केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत

'कष्ट केले की दिवस पालटतातच...' दिग्दर्शक केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) एक लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे (Kedar Shinde) प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनामधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठविला आहे. सध्या ते आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे-   मराठी सिनेसृष्टीतील   (Marathi Film Industry)  एक लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे   (Kedaar Shinde)  प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनामधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठविला आहे. सध्या ते आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer)  या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. दरम्यान ते आपल्या एका अनोख्या पोस्टमुळे सध्या चर्चेत आहेत. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. केदार शिंदे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असतात. इतकंच नव्हे तर ते विविध विषयावर आपलं मतदेखील मांडत असतात. त्यांच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झालेल्या पाहायला मिळतात. आजसुद्धा असंच काहीसं झालं आहे. केदार शिंदे यांनी काही वेळेपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट खरं तर शाहीर साबळे यांच्या लेकीने लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांचा अख्खा जीवनप्रवासच उलगडला आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. केदार शिंदे पोस्ट- प्रवास ‘‘काळ कीती झपाट्याने बदलत जातो नाही! एक काळ होता अगदी स्वातंत्र्य मीळाल्या नंतर लगेचचा..अजुन गावोगावी धड रस्ते झाले नव्हते, प्रवासाची साधनं खेड्यापाड्यात पोचली नव्हती आणि मुळात म्हणजे वीज अजुनही शहरी भागांनाच दिपवत होती तो काळ..शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा तोवर खेड्यापाड्यातच कार्यक्रम करत असत..कधी दहा,बारा कोसाच अंतर असे तर कधी पंधरा,वीस कोसाचही मग धुळभरल्या रस्त्यावरचा वाद्य डोक्यावर,हाता,खांद्यावर अडकवून कीत्येक कोसांचा पायी प्रवास सुरु व्हायचा..कीत्येक ठीकाणी कार्यक्रमानंतर मीळणारं जेवण हीच बीदागी असायची पण तरुण वय होत त्यामुळे काही करुन दाखवायची मनात जीद्द होती..कधी रस्ता चुकला तर चार,पाच कोस अजुन पायपीट व्हायची..

संबंधित बातम्या

त्यांनी पुढे लिहिलंय, ‘‘पण कष्ट केले की दिवस पलटतातच..लवकरच शाहीरांनी मुंबईत बस्तान बसवल आणि एक सेकंडहँण्ड गाडी वीकत घेतली..मधे मधे बंद पडणारी,धक्का द्यावा लागणारी..खर तर शाहीर उत्तम ड्रायव्हर होते ते ड्रायव्हींग कसे शीकले हा संशोधनाचा विषय आहे पण तरीही त्यांनी गाडीवर मुणगेकर नावाचे ड्रायव्हर ठेवले होते…पुढे आयुष्यात त्यांनी बर्याच नव्याकोर्या गाड्या घेतल्या…जीप हा त्यांचा गाड्यांमधला आवडता प्रकार..बरीच वर्ष त्यांनी जीपमधून सर्व कलावंतासह महाराष्ट्र पींजून काढला..पुढे नवीकोरी चेसी घेऊन त्यावर पस्तीस सीटर आरामबस पण बनवून घेतली…त्यानंतर लोकधारा करताना नव्या २४ सीटर गाडीतून ४० कलावंत बसवून परत महाराष्ट्रभर फीरले..पण तरीही त्यांच्या आठवणीत शेवटपर्यंत राहीला हा पायपीट करत केलेला प्रवास…त्यावेळी हातावर भाकरी घेऊन केलेल जेवण, पाटाच्या पाण्यात धुळीने माखलेले हातपाय धूण आणि सतत गाऊन बसलेला आवाज सुटण्यासाठी जेष्ठमध,कंकोळ वगैरे औषध घेण्यासाठी त्यांच्या राजेंद्र बावीसकर या सुशिक्षीत मीत्राने प्रेक्षकांसमोर पैशासाठी पसरलेला हात…लेखिका @vasundharasable’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या