मुंबई, 06 एप्रिल : छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ (mulgi zhali ho) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते किरण माने यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली (kiran mane latest post). त्यामुळे मालिका बंद होणार हे लोकांना पक्कं वाटलं. पण अखेर आता स्टार प्रवाहने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे . गेल्या काही आठवड्यात स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा टीआरपी घसरला आहे. शिवाय ही मालिका ज्या वेळेला लागते त्या वेळेला नवी मालिका प्रसारित होणार आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या जागी आता रात्री 9 वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. याचा अर्थ मालिका बंद होणार असं नाही. तर मुलगी झाली हो मालिका नव्या वेळेत दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका बंद होणार नाही. तर दुपारी 2 वाजता भेटीला येईल, असं स्टार प्रवाहने सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यानंतर याबाबत अभिनेते किरण माने यांनी लांबलचक फेसबुक पोस्ट केली. किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. किरण माने यांनी पुर्वसूचना न देता मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केला होता. शिवाय राजकीय भूमिका घेतल्यामुळेच किरण माने यांना मालिकेतून काढल्याची चर्चा होती. यानंतर बराच वाद रंगला होता. त्यानंतर काही सहकलाकारांनी किरण माने यांच्यावर गैरवर्तन करत असल्याचे आरोप केले होते. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजताच किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित मत मांडलं. किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ? किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘‘‘प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!! हे वाचा - आप्पांनंतर कांचनही घर सोडण्याच्या मार्गावर; अनिरुद्ध काय पाऊल उचलणार? जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.
ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय. …कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय. हे वाचा - घटस्फोट घेतल्यानंतर समंथाला पहिल्यांदाच झाली नागा चैतन्यची आठवण, निमित्त देखील खास कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी. बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.