करण जोहर
मुंबई, 10 ऑक्टोबर : करण जोहर या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो तर खूपच हिट ठरला. सोशल मीडियावर हा शो प्रचंड गाजला. करणं जोहर चित्रपटांव्यतिरिक्त वादांमुळेही चर्चेत असतो. करण काहीही करत नसला तरीही तो वादांचा भाग बनतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हेच कारण आहे म्हणूनच त्याचे नाव ट्विटरवर नेहमीच ट्रेंड करत असते. मात्र, या सगळ्यानंतरही करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या आयुष्याशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टी इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर शेअर करत असतो. पण आता करण जोहरने अचानक ट्विटरचा निरोप घेतला आहे. करणच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते हैराण झाले आहेत. करण जोहरने ट्विटर सोडण्यापूर्वी काही वेळ आधी शेवटचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने त्याने आपल्या चाहत्यांचा निरोप घेतला आहे. त्याने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामागचं कारण काही चाहत्यांना समजलेलं नाही. करणने आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर!’’ करणने अचानक केलेल्या या ट्विटमुळे तो पुन्हा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. हेही वाचा - Bigg Bossमध्ये साजिद खानच्या एंट्रीनं महिला आयोग संतप्त; थेट केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं पत्र मात्र, सोशल मीडिया युजर्सना करण जोहरचा ट्विटरला अचानक रामराम समजला नाही. आता ट्विटरवर प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की करणने हे ट्विटरला गुडबाय का केले? याच कारणामुळे करण जोहरचे नावही काही वेळातच ट्विटरवर ट्रेंड करू लागले आहे. त्याचबरोबर काही सोशल मीडिया यूजर्स यावर करण जोहरची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘सर, तुम्हाला संपूर्ण भारतात शांतता आणि आनंद हवा असेल तर कॉफी विथ करणचा कचरा हटवा.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ’ करण आता हे खाते बंद करेल आणि अज्ञात खाते वापरेल.’ असं असलं तरी मात्र, करण जोहर अजूनही सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्याने नुकतेच ट्विटर सोडले आहे परंतु त्याचे इन्स्टाग्रामवर तो सक्रिय आहे. जिथे तो चाहत्यांना त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देईल. आता करणने ट्विटर वरून घेतलेली एक्झिट नेमकी कशासाठी आहे ते तर येणाऱ्या काळातच समजेल.