मुंबई, 3 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि निर्णायक टेस्ट मुंबईत होत आहे. ही टेस्ट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला 3 मोठे धक्के बसले आहेत. इशांत शर्मा (Ishant Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ainkya Rahane) हे तीन खेळाडू दुखापतीमुळे मुंबई टेस्टमधून आऊट झाले आहेत. बीसीसीआयनं ट्विट करत ही माहिती दिली आहे.
कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानं टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. या निर्णयाक टेस्टमध्ये टीम इंडियातील 3 प्रमुख खेळाडू आऊट झाल्यानं भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. मुंबई टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करत असून तो अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणार आहे.