JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 'या' 5 कारणांमुळे टीम इंडियाला घ्यावे लागले ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण

'या' 5 कारणांमुळे टीम इंडियाला घ्यावे लागले ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण

ऑस्‍ट्रेलिया (Australia) ने भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखूनपराभूत करत सामना खिश्यात घातला

0106

ऑस्‍ट्रेलिया (Australia) ने भारत (India) ला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून एकहाती सामना खिश्यात घातला. टीम इंडिया निर्धारित पूर्ण 50 षटक ही खेळू शकला नाही आणि 255 धावांवर सर्वबाद झाला. 255 धावांचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी डेविड वॉर्नर आणि एरोन फिंचने शतकी खेळी करून सहज विजय मिळवला. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजाची अक्षरश: धुलाई केली आणि 37.4 षटकात विजय मिळवला.

जाहिरात
0206

नाणेफेक : भारताचा पराभव हा नाणेफेक जिंकला नाही तेव्हाच ठरला होता. भारतात दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे अधिक सोईचे होऊन जाते. कारण, थंडीत संध्याकाळ झाल्यावर हवामानातील बदलामुळे पिचवर परिणाम जाणवतो. त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होऊन जाते.आजच्या सामन्यात जेव्हा फिंचने नाणेफेक जिंकला तेव्हा त्याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील जुने रेकॉर्ड पाहता भारताला विजयासाठी मोठ्या आव्हानाची गरज असते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची पिच ही गोलंदाजासाठी मदतगार ठरली आहे. पण टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठा स्कोअर उभा करता आला नाही.

जाहिरात
0306

कमकूवत मधली फळी : टीम इंडियाची मधळी फळी आजच्या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. श्रेयस अय्यर (4), ऋषभ पंत (28) खेळाडू हे कमाल दाखवू शकले नाही. दोघेही लवकर बाद झाले. तर कर्णधार विराट कोहली सुद्धा चौथ्या क्रमांकावर उतरून 4 धावा करून बाद झाला. त्यामुळेच राहुल आणि शिखरची मेहनत वाया गेली. अशामुळे खालच्या फळीतील खेळाडूंवर दबाव येतो यात असा कोणताही खेळाडू नाही जो मोठी खेळी करू शकतो. रवींद्र जडेजा( 25) आणि शार्दुल ठाकुर (13) दोघांनी प्रयत्न केला पण अपयश आलं.

जाहिरात
0406

खराब फलंदाजी : नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाकडून मोठ्या धावफलकाची अपेक्षा होती. पण तसं घडलं नाही. भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. रोहित शर्मा स्वस्तात आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि केएल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली. 1 बाद 134 असा भारताचा धावफलक होता तेव्हा धावांचा डोंगर उभारला जाईल अशी अपेक्षा होती. पण राहुल 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर एक एक करून टीम इंडियाचे खेळाडू बाद झाले.

जाहिरात
0506

केदार जाधवला बाहेर ठेवणे : आजच्या सामन्यात प्लेइंग इलेवनमधून केदार जाधवला बाहेर ठेवलं होतं. केदारने मागील काही सामन्यात सामना जिंकण्यासाठी चांगली खेळी केली होती. पण आजच्या सामन्यात केएल राहुल आणि शिखर धवनला संधी दिल्यामुळे केदार जाधवला बाहेर बसावं लागलं. केदार नसल्यामुळे मधल्या फळीत अनुभव खेळाडू नव्हता. केदारने आतापर्यंत 50 च्या सरासरीने 100 पेक्षा जास्त स्‍ट्राइक रेट ठेवला.

जाहिरात
0606

ऑस्‍ट्रेलियाची शानदार खेळी : भारताच्या पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाची शानदार खेळी. वर्ल्‍ड कप 2019 च्या सेमीफायनलच्या नंतर पहिल्यांदाच आमनेसामने आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमची फूल फॉर्ममध्ये दिसून आली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजावर त्यांनी कायम दबाव निर्माण केला. भारतीय फलंदाजांनी प्रयत्न केला पण धावा घेण्यास यशस्वीपणे रोखलं. त्यानंतर फलंदाजीची वेळ आली तेव्हा वॉर्नर आणि फिंच भारतीय गोलंदाजांवर तुटून पडले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या