मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अश्रू अनावर झालेला क्षण आज अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला. आपल्या भावना अनावर झाल्यानं अजित पवारांना बोलणंही कठीण झालं होतं.