28 सप्टेंबर : मतदारांना नकाराधिकार देणं हा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी असहमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाची भूमिका म्हणजे लोकशाहीवर आघात करणारी आहे, त्यामुळे या निर्णयाचा कोर्टाने फेरविचार करावा अशी भूमिका डॉ. मुणगेकर यांनी मांडलीय. सुप्रीम कोर्टाने मतदारांना नकाराधिकार देण्यात यावा असा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्याविरोधात आज मुणगेकर यांनी आवाज उठवलाय. सुप्रीम कोर्टाने एका बाजूला राजकारणात गुन्हेगारीकरण होऊ नये यासाठी जो निर्णय घेतला तो स्वागतहार्य आहे. पण नकाराधिकाराचा निर्णय दिलाय तो भारतीय लोकशाहीवर आघात करणार आहे लोकांना जर अधिकार दिला तर भारतीय लोकशाही उद्धवस्त होईल असंही मुणगेकर म्हणाले.