नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळानं (Union Cabinet) आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला (Atmanirbhar swastha bharat scheme) मंजुरी (Approval) दिली आहे. एकूण 64 हजार कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये पायाभूत आरोग्य सुविधा आणि औषधं यांचा पुरवठा केला जाणार आहे. 3382 ब्लॉकमध्ये एकीकृत जन स्वास्थ्य लॅबची स्थापनाही या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. काय आहे योजना? यापूर्वीच केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनची घोषणा केली आहे. मात्र ही योजना पूर्णतः वेगळी असून त्याचा राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनशी काहीही संबंध नसल्याची माहिती आहे. या योजनेची घोषणा 2021-22 सालच्या वार्षिक अर्थसंकल्पात करण्यात आली होती. पुढच्या सहा वर्षांसाठी ही योजना असणार आहे. 64,180 कोटी रुपयांचीही योजना असणार असून टप्प्याटप्प्यानं ही तरतूद केली जाणार आहे. ग्रामीण भागाला होणार फायदा देशातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधा पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. देशातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना पायाभूत सुविधा पुरवणे, नव्या आरोग्य केंद्रांची उभारणी करणे, गंभीर आजारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल्सची उभारणी कऱणे अशा अनेक गोष्टी या योजनेअंतर्गत केल्या जाणार आहेत. हे वाचा - पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, सांगितलं धक्कादायक कारण ही कामे होणार