नवी दिल्ली, 7 मार्च: पाच राज्यांच्या निवडणुकीचे EXIT POLLS चे निकाल जाहीर झाले आहेत. पाच पैकी चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश सोडता इतर राज्यांमध्ये सत्ता टिकवून ठेवणं भाजपला जड जाऊ शकतं, असं हे निवडणूक निकालाचे अंदाज सांगतात. Seven sisters पैकी एक असलेल्या मणिपूरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता खेचून आणली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजप सत्तेवर आले, पण आता वेगवेगळं लढताना भाजपच्या पदरात चांगल्या जागा मिळू शकतीस, असा अंदाज आहे. असं असंल तरी स्वबळावर सत्ता खेचून आणणं मणिपूरमध्ये भाजपला जड जाणार आहे. मणिपूरमध्ये 60 विधानसभा जागांपैकी 31 जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे. या वेळी कुठलाच एक पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही असा बहुतेक exit polls चा अंदाज आहे.सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप बहुतमाच्या आकड्याच्या जवळ पोहोचू शकतो, असंही काही सर्व्हे सांगतात. P MARQ ने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजप 31 जागांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे. पण ‘जन की बात’च्या exit poll मध्ये भाजपला थोड्या कमी जागा मिळताना दिसतात.
इतर काही अंदाजांनुसार भाजपच्या जागा मणिपूरमध्ये वाढण्याची शक्यता असली तरी स्वबळावर सत्तेत येणं आणि सत्ता राखणं तितकंसं सोपं नसेल.
CNX च्या अंदाजानुसार भाजपला 26 ते 31 जागा मिळतील. पण तरीही सुस्पष्ट बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूर राहू शकतो. डिझाइनबॉक्स्डने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व्हेमध्ये NPP आणि इतर पक्षांना जागा कमी मिळतील. काँग्रेस 12 ते 17 दरम्यान जागा खेचू शकतो, असं याही सर्वेक्षणात पुढे आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 21 जागा जिंकून एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदींसह अनेक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं होतं. मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याची ती पहिलीच वेळ होती. या वेळी मात्र चित्र वेगळं आहे. या तिन्ही पक्षांनी या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असून, एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी 2017पर्यंत मणिपुरात सलग 15 वर्षं काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसने चार डावे पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांसोबत युती करून यंदा निवडणूक लढवली आहे. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या
या लिंक
वर क्लिक करून मिळेल. मणिपुरात दोन टप्प्यांत मतदान झालं असून, 10 मार्चला निकाल आहे. गेल्या वेळी भाजपने काँग्रेस आमदारांना आपल्या बाजूला वळवलं होतं. या वेळी या दोन्ही पक्षांची परस्परांच्या नेत्यांवर नजर आहे. त्यामुळे नेमकं काय होतं, ते लवकरच कळेल.