JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादात, मुंबई पोलिसांकडून तब्बल 36 गुन्हे दाखल

भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादात, मुंबई पोलिसांकडून तब्बल 36 गुन्हे दाखल

BJP Jan Ashirwad Yatra: केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु केली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चांगलाच दणका दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: भाजपच्या (BJP) जन आशीर्वाद यात्रेला (Jan Ashirwad Yatra) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चांगलाच दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु केली. मात्र या यात्रेवर पोलिसांनी 36 हून अधिक गुन्हे दाखल केलेत. कोविडच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं (BJP) जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) 36 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. 19 ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या

कपिल पाटील यांच्याही जन आशीर्वाद यात्रेवर कारवाई भारतीय जवानांना मोठं यश,  जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या