मुंबईत दहशत निर्माण करण्याचा कट!
मुंबई, 26 एप्रिल : देशाची आर्थिक राजधानी कायमच दहशतवाद्यांच्या रडारवर असते. मुंबईत पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा कट रचला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजेच 1 मे रोजी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परेड दरम्यान दहशतवादी आणि समाजकंटक हल्ला करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे. शिवाजी पार्कची एअर स्पेस दहशतवादी हल्ल्यासाठी वापरली जाऊ शकते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे.
या इनपुटनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता पाहता सध्या कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच दादर, शिवाजी पार्क माहीम आणि वरळी हे भाग नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलीस सतर्क दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंटेलिजन्स इनपुटनंतर आता पोलीस पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पुरेपूर काळजी घेत आहेत. वाचा - धर्मगुरुचा एक संदेश अन् मृत्यूचं तांडव; केनियात नेमकं काय घडलं? यंदा राज्यगीताने महाराष्ट्र दिन साजरा होणार ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या मराठी माणसांच्या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रगीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात आला आहे.