JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सरकार या दिवसाची वाट पाहत होतं का? दिल्लीतील राड्यावरून शिवसेनेचा गंभीर आरोप

सरकार या दिवसाची वाट पाहत होतं का? दिल्लीतील राड्यावरून शिवसेनेचा गंभीर आरोप

दिल्लीतील घटनेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी : ‘शेतकऱ्यांना भेटायचं नाही, शेतकऱ्यांची माथी भडकवायची आणि देशभर वणवा पसरवायचा. तसंच त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, असं काही षडयंत्र सध्या सुरू असल्याचा संशय मला वाटत आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का? ’ असा सवाल करत दिल्लीतील घटनेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘ज्या कायद्यापासून लोक खुश नाही त्या कायद्याचा काय उपयोग? कोणासाठी हे कायदे बनवले आहेत? दिल्लीच्या रस्त्यावर अराजकता पसरली. शेतकऱ्यांना खालिस्तानी, अतिरेकी म्हणून माहोल बिघडवला जात आहे. आज हे व्हायला नको होतं. शिवसेना याची निंदा करते. सरकारने याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. कुण्या दुसऱ्याचं सरकार असतं तर राजीनामे मागितले गेले असते. आता याबाबत कोणाचा राजीनामा मागितला जाईल?’ अशा खरमरीत प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : - दुपारी दिल्लीच्या रस्त्यावर जो नजारा दिसला तो ना आंदोलकर्त्यांना शोभतो ना सरकारला - गेल्या 2 महिन्यात शांतीपूर्ण आंदोलन सुरू होतं - असं शिस्तबद्ध आंदोलन संपूर्ण विश्वात नाही झालं - संयमाने सुरू असलेल्या आंदोलनात अचानक काय झालं की आंदोलक आक्रमक झाले - सरकार या दिवसाची वाट पहात होती का? - 3 कृषी विरोधी कायद्याचा हा प्रश्न आहे. - आजच्या घटनेची निंदा केली पाहिजे पण माहोल बिघडण्यासाठी सरकारचा अहंकार जबाबदार आहे - त्यामुळे संपूर्ण देशाचा माहोल बिघडू शकतो - हजारो शेतकरी मुंबईत आले पण माहोल बिघडू दिला नाही - मुंबईत अशी घटना झाली असती तर उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचा राजीनामा मागितला असता - शिवसेना शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाजून आहे, पण आजच्या घटनेची आम्ही निंदा करतो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या