वीज ग्राहकांचे अधिकार
मुंबई, 3 जुलै : पावसाळा सुरु झाला की, लाइट जाण्याचं प्रमाणं वाढतं. अशा वेळी आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. पण विज ग्राहकांनो तुम्हाला तुमचे अधिकार माहिती आहेत का? कारण विज गेली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. ती कशी आणि त्याचा नेमका नियम काय आहे याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. विद्यूत कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यूत पुरवठा खंडीत करु शकत नाही. कोणतीही सूचना न मिळता जर शहरी भागांमध्ये 4 तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडी राहिला तर प्रभावित झालेले ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी करु शकतात. Anniversary of GST: मोबाईल-फ्रिजसह अनेक गृहउपयोगी वस्तूंवरील GST सरकारने कमी केला का? पूर्ण प्रकरण काय? तक्रार केल्यानंतर काय? विद्युत ग्राहकांची तक्रार सोडवण्यासाठी तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक मंडल क्षेत्रामध्ये निवारण केंद्राची स्थापना केलेली असते. स्थानिक पातळीवर तक्रारीचं निवारण झालं नाही तर विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करु शकतात. यासोबतच प्रत्येक लाइट बिलावर तक्रार निवारण केंद्राचा पत्ता देखील दिलेला असतो. WhatsApp पेमेंट करुनही मिळवता येईल इन्शुरन्स, पाहा कोण देतंय ही सुविधा! यासाठी काही फिस लागते का? ग्राहकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कोणतीही फिस आकारली जात नाही. ग्राहक स्वतःहा याविषयी तक्रार चालवू शकतो. या प्रकरणाचा निकाल दोन महिन्यांच्या आत देणं बंधनकारक असतं. यासोबतच ग्राहकांना बिल सोपल्याची तारीख आणि दंडाशिवाय बिल बरण्याची तारीख यांच्यात 21 दिवसांचं अंतर असायला हवं.