नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: देशात डिजिटायझेशनला (Digitization in India) चालना मिळाल्याने रोख रक्कम (cash transactions) वापरत व्यवहार करण्याऐवजी ई-वॉलेट (e-wallets) आणि यूपीआयचा (UPI) वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांना फक्त आर्थिक सेवा (financial services) मिळणं सोपं झालं नाही, तर त्यांच्या आर्थिक व्यवहार (financial transactions) करण्याच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. ते रोख रक्कम वापरून व्यवहार करण्याऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआय (Cashless Transaction in India) वापरत आहेत. याबाबत, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणतात की, ‘फिनटेक कंपन्यांच्या आगमनामुळे आर्थिक समावेशन झाले आहे. याचाच अर्थ वित्तीय सेवांचा अधिक विस्तार झाला आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम वापरून व्यवहार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.’ डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं नीती आयोगाच्या फिनटेकसंबंधी शिखर परिषदेत बोलताना राजीव कुमार म्हणाले की, ‘अधिक न्याय्य, समृद्ध आणि आर्थिक समावेशक भारत निर्माण करण्यासाठी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. भारतात डिजिटायझेशन वाढत आहे, आणि लोकांना आर्थिक सेवा सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारात बदल झाला आहे. आता ते रोख रक्कमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर करत आहेत.’ हे वाचा- Gold Price Today: सोनं पुन्हा महागलं, आज 10 ग्रॅमसाठी किती काय आहे भाव? यूपीआयसारखं व्यासपीठ तयार करण्यावर सरकारचा विश्वास या परिषदेत बोलताना केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘सरकार आरोग्य, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रांसाठी कोविन (COVIN) आणि यूपीआय (UPI) सारखं खुलं व्यासपीठ तयार करण्यावर विश्वास ठेवतं. सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे असं एक खुलं व्यासपीठ तयार केलं गेलं आहे, ज्याद्वारे अनेक खासगी उद्योजक, स्टार्टअप आणि डेव्हलपर्स नाविन्यपूर्ण गोष्ट करण्यासाठी एकत्र येऊ शकतात.’ हे वाचा- 7 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर क्रूड ऑइलचा दर, पाहा Petrol-Diesel दरावर काय परिणाम डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढावं, यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. तसंच कोरोना महामारीच्या काळात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. कारण कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात लोक एकमेकांकडून रोख रक्कम स्वीकारण्याचं टाळताना दिसत होते. त्याऐवजी डिजिटल पेमेंटवर भर देत होते. कोरोना काळात एकमेकांचा संपर्क टाळला जावा, यासाठी याला प्राधान्य दिलं जात होतं. याशिवाय स्मार्टफोनचा वाढलेला वापर सुद्धा डिजिटल व्यवहार वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अॅपमुळे एकमेकांना पैसे पाठवणं सहज शक्य होत आहे.