रत्नागिरी, 13 जून: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस पुन्हा रेड (Red Alert) अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसंच हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा देखील (Ratnagiri Heavy Rain) कायम आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पाऊस सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्या आटोक्यात आहे. कोणत्याही नदीनं धोक्याची पातळी ओलांडली नाही. तसेच जिल्ह्यामध्ये अजूनही अति मुसळधार पाऊस कोसळत नसल्याने जनजीवन पूर्वपदावर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन मात्र सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले असून एनडीआरएफच्या दोन तुकड्या सुद्धा जिल्ह्यात तैनात ठेवण्यात आले आहेत.
कुठेही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ लोकांना मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहे . जिल्ह्यातील पूर बाधित राजापूर खेड, चिपळून अशा नगर पालिका आणि नदी खाडी किनारपट्टीवरील लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी सर्व उपाययोजना करून झाले आहे. तसेच यापूर्वी जिल्ह्यातील धोकादायक वस्तूंचे स्थलांतर करण्यात आले आहे. हेही वाचा- मुंबईत पावसाचा Break, पण कशी असेल आजची पावसाची स्थिती; जाणून घ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना देण्यात आले आहेत. समुद्राला मोठे उधाण असल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे.
खेडमध्ये ही NDRF चे पथक दाखल झाले आहे. जगबुडी नदी किनारी असलेल्या खेड शहरात दरवर्षी पुराचे पाणी शिरते आणि खेड शहरातील निम्मा भाग पाण्याखाली जातो. त्या सर्व पूर प्रणव क्षेत्राची शनिवारी संध्याकाळी उशिरा NDRF च्या पथकाने पाहणी केली. खेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पुराचा धोका असलेल्या खेड शहरातील सफा मशीद चौक , पान गल्ली, गुजर आळी, गांधी चौक , नावाचा तळ, तीन बत्ती नाका , खेड दापोली मार्गावरील एकविरा नगर परिसरात जाऊन पाहणी केली.