JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / एकीकडे कडाक्याच्या उष्म्याने जिवाची काहिली, दुसरीकडे पाणीटंचाईने नाशिकवासियांचा थेंबा-थेंबासाठी संघर्ष

एकीकडे कडाक्याच्या उष्म्याने जिवाची काहिली, दुसरीकडे पाणीटंचाईने नाशिकवासियांचा थेंबा-थेंबासाठी संघर्ष

देशातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या लोकांना भेडसावत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई यामुळे नागरिकांचे जगणं कठीण झालं आहे. जिल्ह्यातील एका गावात पाण्याचे भीषण संकट निर्माण झालं आहे. हिरिडपाडा असं गावाचं नाव असून येथे थेंब थेंब पाण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे.

0105

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाशिक जिल्ह्यातील हिरिदपाडा गावात जलसंकटामुळे अनेकांनी घरं सोडली आहेत. (सर्व फोटो - ANI)

जाहिरात
0205

एएनआयच्या वृत्तानुसार, पाण्याच्या संकटामुळे महिलांना पाणी आणण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो आहे.

जाहिरात
0305

एएनआयशी बोलताना नाशिक जिल्ह्यातील हिरिदपाडा येथील रहिवाशांनी आपली समस्या सांगितली. ते म्हणाले की, गावात पाण्याचं भीषण संकट आहे. त्यामुळे बाहेरच्या गावातील लोकांना आपल्या मुलींची लग्न आमच्या गावात व्हावी, असं वाटत नाही. या समस्येमुळे अनेकांनी गाव सोडलं आहे.

जाहिरात
0405

नाशिक, नागपूरसह अनेक शहरांतील पाण्याचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागपुरातील नारी परिसरात पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांना पाण्याच्या विहिरी आणि टँकरमधून पाणी भरावं लागत आहे.

जाहिरात
0505

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 ते 27 मे दरम्यान मुंबई आणि उपनगरातील काही भागात पाणीटंचाई जाणवणार आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, या चार दिवसांत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पाणी येणार नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या