'समृद्धी महामार्ग आपण लवकरच मोकळा करणार आहोत. शिर्डीपर्यंत प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे.
नागपूर, 23 ऑक्टोबर : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्ण होत आले आहे. पण हा महामार्ग कधी सुरू होणार याची प्रतिक्षा अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे. पुढील नोव्हेंबर महिन्यात समृद्धी महामार्ग हा शिर्डीपर्यंत खुला होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ‘समृद्धी महामार्ग आपण लवकरच मोकळा करणार आहोत. शिर्डीपर्यंत प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर शिर्डी ते नागपूर दुसऱ्या टप्प्यात मोकळा केली जाईल. नोव्हेंबर महिन्यातच शिर्डीपर्यंत प्रवासासाठी मोकळा केला जाईल, अशी घोषणाही शिंदेंनी केली. दिवाळीमध्ये आम्ही मनसेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण आनंदाचा साजरा होताना आपण राज्यामध्ये पाहत आहोत. यावेळी आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटामध्ये आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत असतात, असंही शिंदे म्हणाले. ( शिंदे-फडणवीस सरकारचा तो निर्णय, अजितदादांकडून कौतुक पण शरद पवारांची टीका ) ‘नाना पटोले यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हे भाष्य मुळात हास्यास्पद आहे. आमच्याकडे मोठ बहुमत आहे. भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. ती महिन्यामध्ये 72 मोठे निर्णय घेतले आहे. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेना हा दुसरा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांना बोलू द्या. विरोधी पक्ष टीका करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला कामाने प्रत्युत्तर देऊ’ असा पलटवारही शिंदेंनी केला. (नाशिकमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात वाद चिघळला, पोलिसांनी कार्यालयाच केले सील) ‘परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. निकक्षामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. एनडीआरएफच्या निकक्षापेक्षा जास्त मदत देणार आहोत’ असं आश्वासनही शिंदेंनी दिलं,