01 एप्रिल : विरोधकांची संघर्ष यात्रा आज औरंगाबादमध्ये पोहचली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर भोजन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पंगतीत जेवण केलं. जेवण करता करता या नेत्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.