JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बिहार दौरा अन् तेजस्वी यादव यांची भेट कशासाठी? आदित्य ठाकरे म्हणाले 'थर्ड फ्रंटबद्दल विचार...'

बिहार दौरा अन् तेजस्वी यादव यांची भेट कशासाठी? आदित्य ठाकरे म्हणाले 'थर्ड फ्रंटबद्दल विचार...'

या दौऱ्यात काही राजकीय चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 नोव्हेंबर : आदित्य ठाकरे हे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुन शिंदे गटाच्या काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता या दौऱ्याबाबत आदित्य ठाकरे यांनीच माहिती दिली आहे. ‘तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. या दौऱ्यात काही राजकीय चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही. थर्ड फ्रंटवर काही विचार करू नका. त्यावर मोठे नेते बोलतील. आम्ही केवळ पर्यावरण विषयावर बोलणार आहोत. माझा काही अजेंडा नाही. आम्ही फोनवर बोलत होतो. फोनवर अनेकवेळा बोलणं झालं होतं. आज प्रत्यक्ष भेटणार आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ..ही लोक महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील, संजय राऊत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर संतापले, शिंदेंनाही सुनावलं यासोबतच ज्यांनी पीडीपीबरोबर युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये. ज्याच्या विरोधात भाषण केली त्यांच्याबोरबर जाऊन बसले, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, की जे राज्यपाल महाराष्ट्राचे असून शिवाजी महाराजांबद्दल असं बोलतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही तुमची भुमिका स्पष्ट करा आणि राज्यपालांवर काय कारवाई करणार ते सांगा, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांनाही फटकारलं. कर्नाटक सरकारची महाराष्ट्राच्या जमिनीवर नजर, सांगलीतील गावांवर सांगितला दावा आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, की मी आज एक बातमी ऐकली की आज मंत्रिमंडळ बैठक रद्द झाली. कारण एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. यांनी आधी आमदार मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले आहेत. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असा टोला त्यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या