खडसे यांचे 10 नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
इम्तिजाज अहमद, प्रतिनिधी जळगाव, 19 जुलै : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहे. त्यामुळे खडसे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपला कालावधी संपण्याच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला होता. याबाबत भुसावळ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका पुष्पापत्रा यांनी पक्ष बंदी कायदा अंतर्गत याचिका दाखल केली होती. ( दैनंदिन राशीभविष्य: मीन राशी आज अचानक होणार मालामाल; काय सांगतं आजचं भविष्य ) या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (eknath khadse) गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ( राजकर्त्यांनी जनतेला इतकं गृहीत धरावं? शिवसेनेचा आता मोदी सरकारवर निशाणा ) पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाच वर्षांसाठी अपात्र केले. या सर्वांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निकालामुळे खडसे आणि भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे. काय आहे प्रकरण? 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर रमण भोळे, तर नगरसेवक पदावर अनुक्रमे अमोल इंगळे (प्रभाग १ ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १ अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब) मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते (२२ ब), व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) हे निवडून आले होते. पण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी 17 डिसेंबरला 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यासाठी या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणीभाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी केली होती. खडसे यांचे 10 नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.