डायरी लिहिण्याची सवय अनेकांना असते. भूतकाळात घडलेल्या घटना आठवणीत ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे.
तणाव होईल दूर आपली भावना कागदावर उतरवून काढण्यामुळे मनातील चिंता, समस्या, वेदना, दूर होण्यास मदत मिळते. कागदावर आपल्या मनातला आक्रोश निराशा, दुःख, व्यक्त करणाण्याने आपल्या मनातील भावनांची तीव्रता कमी होते आणि मन शांत झाल्यामुळे आपण योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो.
स्मरणशक्ती वाढते जेव्हा डायरीमध्ये आपण आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना लिहून काढतो तेव्हा, त्या लक्षात ठेवण्यास देखील मदत होते.
एकटेपणा जाणवत नाही डायरी लिहिण्याने आपल्या मनातल्या भावना इतरांकडे व्यक्त करण्याची गरज पडत नाही. एखाद्या मित्राप्रमाणे आपण आपल्या डायरीशी बोलू शकतो.
लिखाणाची सवय लागते लिखाणाची सवय सुधारायची असेल तर, डायरी लिहिण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे आपल्याला लिखाणाची सवय लागू शकते.
ध्येय निश्चिती आपली महत्त्वाकांक्षा, इच्छा आणि संकल्प डायरीमध्ये लिहून ठेवण्याने ध्येयावर लक्ष केंद्रीत करता येतं. वर्षाच्या सुरुवातीला वर्षभराचं नियोजन करू शकतो. डायरीमध्ये संकल्प लिहून ठेवल्यामुळे स्वतःच्याच प्रगतीचं मूल्यमापन करता येतं.