हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये मानवी जीवनातील संकटांच्या लक्षणांचीही माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला ही चिन्हे समजली तर, तो आपल्या जीवनातील त्रास मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशी अनेक शुभ-अशुभ चिन्हं मानवाला दिसतात. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा अशा काही चिन्हांबद्दल सांगत आहेत.
जर एखाद्याच्या घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर, भविष्यात त्या घरातील सदस्यांचा कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. यासोबतच ही बाब घरातील सदस्यांचं आजारपण आणि पैशाची हानी याकडेही निर्देश करते, असं अनेकजण मानतात.
जर एखाद्या व्यक्तीला किंवा घरातील सदस्यांना घुबडाचे रडणे वारंवार ऐकू येत असेल किंवा घुबड तुमच्या घराकडे पाहून ओरडत असेल, तर ते भविष्यात त्या घरात कोणाचा मृत्यू होण्याची चिन्हं आहेत, असं काहींचं म्हणणं आहे.
असं मानलं जातं की, जर एखाद्या व्यक्तीच्या घरात ठेवलेली तुळस पुन्हा-पुन्हा सुकत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही वाईट घटना येण्याचे संकेत असू शकतात.
अचानक तुमच्या घरात उंदीर, कीडे, मधमाशी, दीमक किंवा इतर कोणतेही कीड्यांसारखे जीव अचानकच आले तर, ते चांगलं मानलं जात नाही. त्यांचं येणं अशुभाचं लक्षण मानलं जातं.
जर एखाद्या व्यक्तीच्या घरात आरसा, पलंग, खुर्ची, टेबल अशा काही वस्तू अचानक स्वतःहून तुटल्या तर त्या व्यक्तीला भविष्यात अशुभ होण्याचे संकेत मिळतात, असं बरेच लोक मानतात.