एकमेकांच्या प्रेमात पडून नातं एंगेजमेंटपर्यंत पोहोचलं, पण लग्नापूर्वीच झाले वेगळे… अशा 5 सेलेब्रिटी जोड्याची Relationship Story पाहा फोटो.
करणसिंग ग्रोव्हर - बरखा सेनगुप्ता 2004 मध्ये करण आणि बरखा डेटिंग करत होते. त्यांनी लग्न केल्याची पण चर्चा होती. पण 2006 मध्ये ते वेगळे झाले होते. करणने बिपाशा बासूशी लग्न केलं आहे, तर बरखाने इंद्रनील सेनगुप्तावर प्रेम केलं.
करिश्मा टन्ना - उपेन पटेल: करिश्मा आणि उपेन बिग बॉस 8 दरम्या प्रेमात पडले. नंतर दोघांनी कपल म्हणून नच बलिये मध्ये भाग घेतला. दोन वर्षांनंतर त्यांचं ब्रेक-अप झाले. करिश्मा त्यावर सांगते “कधीकधी काय चूक झाली याचं उत्तर मिळत नाही. कधीकधी दोन चांगल्या मनाचे लोक एकत्र येऊ शकत नाही".
शिल्पा शिंदे - रोमित राज: शिल्पा आणि रोमितची प्रेमकथा टीव्ही शो मायकाच्या सेटवर सुरू झाली. त्यांची एंगेजमेंट झाली परंतु लग्नाच्या तारखेच्या एक महिन्याआधीच लग्न मोडलं . शिल्पा म्हणते, “तो योग्य निर्णय होता आणि मी समाधानी आहे. मी आता माझे स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे".
चारू असोपा - नीरज मालवीय: राजीव सेनशी लग्न करण्यापूर्वी चारूने नीरजशी एंगेजमेंट केली होती. टीव्ही शो मेरे अंगने मेच्या सेटवर दोघे प्रेमात पडले. ते 2016 मध्ये एंगेज झाले आणि एका वर्षाच्या आतच ब्रेकअप केले.
महक चहल - अश्मित पटेल: गेल्या वर्षीच मेहेक आणि अश्मितने त्यांचं पाच वर्षांचं नाते संपवलं. मेहेक म्हणाली , “जेव्हा तुम्ही एकत्र राहण्यास आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीबरोबर जास्त वेळ घालविण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची खरी ओळख होते. मला वाटत नाही की अश्मित माझ्यासाठी योग्य व्यक्ती होती"