टीव्ही दुनियेतील या लोकप्रिय कपल्सनी लग्नाच्या काही वर्षानंतरच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जाणून घ्या कोणकोण झालं आतापर्यंत विभक्त…
मनोरंजन विश्वातील अनेक अशा लोकप्रिय जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या काही वर्षानंतरच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यात अनेक नावजलेल्या कलाकरंचाही समावेश आहे. जाणून घ्या कोण आहेत हे कपल्स.
करण मेहरा-निशा रावल टीव्हीच प्रसिद्ध कपल करण मेहरा आणि निशा रावल सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यातील वादविवाज आता घटस्पोटापर्यत येऊन पोहोचले आहेत.
आमिर अली-संजीदा शेख आमिर अली आणि संजीदा शेखचे अनेक चाहते होते. पण ते दोघेही आता वेगळे झाले आहेत. हर्षवर्धन राणेमुळे ते वेगळे झाले असल्याचं बोललं जात आहे.
नंदीश संधू-रश्मि देसाई रश्मि देसाई आणि नंदीश संधू यांनी 2012 मध्ये विवाह केला होता. पण 2016 मध्ये ते विभक्त झाले.
करण सिंग ग्रोवर-जेनिफर विंगेट अभिनेता करणसिंग ग्रोव्हर आणि जेनिफर यांनी २०१२ मध्ये विवाह केला होता पण काहीच दिवसांत ते वेगळे झाले. त्यानंतर करणने बिपाशा बासूसोबत विवाह केला.
पुलकित सम्राट-श्वेता रोहिरा क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण करणारा बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राटने 2014 श्वेता रोहिरासोबत विवाह केला होता. पण एक वर्षातचं ते विभक्त झाले.
श्वेता तिवारी-राजा चौधरी श्वेता तिवारी पती अभिनव कोहली सोबतच्या विवादामुळे चर्चेत आहे. अभिनवच्या आधी श्वेता तिवारीने राजा चौधरी सोबत विवाह केला होता. 1998 मध्ये त्यांनी विवाह केला पण नंतर ते वेगळे झाले त्यांना एक मुलगी देखिल आहे.
शालीन भानोट-दिलजीत कौर: शालीन भानोट आणि दिलजीत कौरने 2009 मध्ये प्रेमविवाह केला होता पण त्यानंतर दिलजीतने शालिनवर घरगुती हिंसेचे आरोप केले आणि 2015 मध्ये ते विभक्त झाले.