बॉलिवूड मध्ये अशा अनेक प्रसिद्ध तसेच य़शाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. तर संपूर्ण वेळ हा आपल्या मुलांना कुटुंबाला देण्याचं ठरवलं.
बॉलिवूड मध्ये अशा अनेक प्रसिद्ध तसेच य़शाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. तर संपूर्ण वेळ हा आपल्या मुलांना कुटुंबाला देण्याचं ठरवलं. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री
60 च्या दशकात आपल्या अभिनयची जादू दाखवणारी तसेच बॉलीवूडची टॉप स्टार राहिलेली अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी मुलांना जन्म दिल्यानंतर अभिनय सोडून दिला होता. त्यांनी एकदा सांगितले होते कि शुटींगच्या बिझी वेळापत्रकातून मुलांना वेळ देणं शक्य नसतं.
अभिनेत्री बबीता यांनी 6 नोव्हेंबर 1971 ला रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतरच त्यांनी अभिनय सोडून दिला होता. तर करिश्मा आणि करीना यांच्या जन्मनंतर त्या या क्षेत्रापासून पूर्णपणे दूर झाल्या.
नीतू कपूर यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांत काम केलं होत. पण रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय सोडला.
90 च्या दशकात सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री करिश्मा कपूर 2003 मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला पण तिचा पतीसोबत घटस्पोट झाला. सध्या करिश्मा मुलांसोबत राहत आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे ने 12 नोव्हेबंर 2002 ला फिल्म दिग्दर्शक गोल्डी बहल सोबत लग्न केलं होत. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर तिने करिअर मधून ब्रेक घेतला.
Mothers Day Special, Mothers Day 2021, Bollywood, Sharmila Tagore, Babita Kapoor, Neetu Kapoor, Karisma Kapoor, Sonali Bendre, Lara Dutta, Aishwarya Rai Bachchan, Genelia D'Souza, बॉलीवुड, शर्मिला टैगोर, बबीता कपूर, नीतू कपूर, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे, लारा दत्ता , ऐश्वर्या राय बच्चन, जेनेलिया डिसूजा
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन विषयी वेगळी माहिती देण्याची गरज नाही. ऐश्वर्या एक यशस्वी अभिनेत्री होती पण मुलीच्या जन्मानंतर तिने ब्रेक घतला. पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो तितका यशस्वी ठरला नाही.
अभिनेत्री जेनेलिया डिसोजा ने 2012 मध्ये रितेश देशमुख सोबत विवाह केला होता. पण मुलांच्या जन्मानंतर ती चित्रपटांत कधीच दिसली नाही.