03 एप्रिल : व्हिसाबंदीवरुन सर्वांचं लक्ष अमेरिकेकडे लागलं आहे. मात्र सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचे व्हिसा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सिंगापूर सरकारने व्यापक आर्थिक सहकार करारवर स्थगिती आणली आहे. व्यापार कराराचा हवाला देत ही समिक्षा सुरू करण्यात आली होती. तर भारतीय कंपन्यांनाही स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत काही कंपन्यांनी तिथलं काम बंद करुन आपलं बस्तान दुसऱ्या देशांमध्ये हलवण्यास सुरूवात केलीये. सर्वात आधी सिंगापूरला जाणाऱ्या कंपन्यांमध्ये एचसीएल आणि टीसीएसचा समावेश होता. यानंतर इन्फोसिस, विप्रो, कॉग्निजंट आणि एल अँड टी इन्फोटेकने सिंगापूर गाठलं होतं.