फेब्रुवारी महिनाअखेरीपासून सुरू झालेल्या उन्हाच्या झळा काही थंड होण्याचं नावच घेत नाहीयेत. त्यातच विदर्भ आणि मराठवाडावासियांना काहीसा दिलासा मिळाला. कारण इथल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे घामाच्या धारांपासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र हाल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत, त्यात आता राज्यात पुढील काही दिवसही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे असणार आहेत.