बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य आणि पटनादेवी वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते. यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये वन्यप्रेमींनीही सहभाग नोंदवला. याबाबत मानद वन्यजीव संरक्षक डॉक्टर किशोर पाठक यांनी माहिती दिलीय.