बॉलिवूड सिनेअभिनेते आमिर खान यांनी वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला रविवारी भेट दिली. सुरुवातीला शहरातील पाणी फाउंडेशनचा कार्यक्रमला त्यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते या ठिकाणी आले होते. यावेळी आश्रमाकडून आमिर खान यांना कातलेल्या सुताची माळ आणि चरखा भेट स्वरुपात देण्यात आला. यावेळी आमिर खान यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.