सातारा हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, इथं अनेक क्रांतिकारी निर्णय झाले आणि देशभर क्रांती पेटली. आपल्या हक्कांसाठी हीच लढाऊ वृत्ती इथल्या आजच्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते. जिल्ह्यातील काेरेगाव तालुक्याच्या बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी 18 जून रोजी रेल्वे मार्गावर आंदोलन केलं. चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालक आणि गावकऱ्यांसह रेल्वे महामार्ग अडवून धरला. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.