Raju Shetti On Onion : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांद्याला फटका, राजू शेट्टींचे मोदींना पत्र...बांगलादेश हिंसाचाराचा कांद्याला व्यापाऱ्यांना बसलाय.. कारण नुकतीच बांगलादेशमध्ये 80 हजार टन कांद्याची निर्यातसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती.. त्याप्रमाणे नाशिकमधून बांगलादेशसठी काही ट्रक गेले होते.. मात्र 70 ते 80 ट्रक बांगलादेश सीमेवर अडवल्याची माहिती मिळतेय..सीमा सुरु होण्यास आणखी 5 ते 6 दिवस लागण्याची शक्यता आहे.. या प्रकरणाची दखल घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय.. बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी हस्तक्षेप करण्याची राजू शेट्टींनी केलीये..केंद्र सरकारने बांगलादेशच्या काळजीवाहू सरकरशी संपर्क करण्याचं आवाहन केलंय.. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकर ना फटका बसत असल्याचे पत्रात नमूद केलंय.