पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हॉकीच्या अखेरच्या गट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. यासह भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑलिम्पिकमधील विजयाचा 52 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. याआधी 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघ ब गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.