हिंदू धर्मात एकादशी व्रताला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी लोक उपवास करून श्री विठ्ठलाची पूजा करतात. प्रत्येक एकादशीचंही एक वेगळं महत्त्व आहे. अशाच एकादशींपैकी एक म्हणजे पापमोचनी एकादशी होय. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. हे एकादशी व्रत केल्यास जन्मोजन्मीची पापे धुवून जातात, अशी मान्यता आहे. मुंबई येथील पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी या एकादशीचं महत्त्व सांगितलं आहे.