सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तरीही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील पापरीचे शेतकरी विलास जगन्नाथ टेकळे यांच्याही नावाचा समावेश होतो. रासायनिक खतांच्या धोक्यांची जाणीव झाल्याने अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करला. तीन वर्षांच्या प्रयत्नातून नैसर्गिक फळ संजीवकाची निर्मिती केली. आता गोआधारित सेंद्रिय शेतीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे अनेक शेतकरी येत आहेत.