सध्याच्या काळात मोबाईल ही जणू रोजची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा थेट परिणाम वापरकर्त्याच्या मानसिक आरोग्यावर होताना दिसून येतो. यामध्ये तरुणच नाही तर लहान मुलं देखील मोबाईच्या व्यसनाचे बळी पडत आहेत. तासनतास मोबाईल पाहण्यानं नैराश्य येऊ शकतं आणि यातून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. याबाबत पुणे येथील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांनी माहिती दिलीय.