कविता करणे हा अनेक जणांचा छंद असतो. तो छंद जोपासण्याचा प्रयत्न ही अनेकांकडून पूर्ण केला जातो. असाच छंद जोपासला आहे हिंगोलीच्या गणेश आघाव यांनी. बालपणापासून यमक जोडून काव्य रचत, शेतीत काम करत शेतकऱ्याच्या मुलाने कविता लिहिल्या आणि त्या कविता सातासमुद्रापार पोहोचल्या. तसेच अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित देखील करण्यात आल्या आहेत.