आपण आपल्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वतोपरी आई वडिलांवर अवलंबून असतो. मात्र कमावते झाल्यावर तेच आई-वडील आपल्याला ओझे वाटू लागतात. याच कारणामुळे आजकाल वृद्धाश्रमांमध्ये वयस्कर लोकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र कोल्हापुरात या विरोधात एक मोहीम एका ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. दऱ्याचे वडगाव या ग्रामपंचायतीने आई-वडिलांची नीट काळजी न घेणाऱ्या मुलांच्या सर्व सोयी सुविधाच थेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.