वास्तू निर्मिती ही एक कला आहे. जुन्या काळात माती, कवेलू यासारख्या वस्तूंपासून घर बनवले जायचे. आता सिमेंटच्या युगात अशी घरं ग्रामीण भागातही क्वचितच दिसतात. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांना पुढे नेणारं ग्रामीण विज्ञान केंद्र (CSV) वर्ध्यात 1980 मध्ये स्थापन झालं. या केंद्राच्या वतीनं जुन्या घरांची उरलेली माती आणि कवेलू वापरून ‘वर्ल्ड रूफ टेक्नॉलॉजी’ने पर्यावरण पूरक घर बनविलं जातंय. त्यामुळं ग्रामीण हातांना काम मिळालं असून हे घर बनवण्यासाठी खर्चही कमी येतोय. विशेष म्हणजे उष्ण वातावरणात हे घर आतून थंड राहतं.