बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? हा अनेक विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध असणारं क्षेत्र निवडण्याकडेच सर्वांचा कल असतो. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे होम सायन्स होय. होम सायन्समधील विविध कोर्सला प्रवेश घेऊन नोकरी आणि व्यवसायाची सुवर्णसंधी मिळू शकते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्राची गिरी यांनी माहिती दिलीय.