BJP Slogan : मुंडे, चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगे आमच्या पक्षाचा नारा नाहीचउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या प्रचार सभेत ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा केली होती. त्यानंतर योगींच्या या घोषणेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थही समजावून सांगितला होता. मात्र तरी देखील अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात आता भाजपच्याच एका मुख्यमंत्र्याने या घोषणेला विरोध केला आहे.