मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन जवळ आलेली असतानाच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात रक्ताचे नातेवाईक कोण? यावरून बराच वेळ चर्चा झाली, पण यातून काहीच तोडगा निघाला नाही. आई जर कुणबी असेल तर मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. रक्ताचे नातेवाईक कसे लाभ घेणार? यावर शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली.