गोरगरीब जनतेसाठी सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. सर्वांना दोन वेळ पोटभर अन्न मिळावे यासाठी रेशन कार्डवर धान्य दिले जाते. मात्र याच रेशन धान्याचा काळाबाजार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे गरजूंच्या तोंडचा घास काढून घेतल्याचा प्रकार टाळण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. धान्य खरेदी बाबत शासनाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबत बीडमधील जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांनी माहिती दिलीय.