‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलनस्थळी सांगितले.