हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली असताना शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. मुंबईतील अनेक भागांतही शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर नाशिक, जळगावला गारांच्या पावसाने झोडपलं आहे.