विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. विराटच्या जागी कॅप्टनसीच्या शर्यतीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वात आघाडीवर आहे. रोहित कॅप्टन झाला तर व्हाईस कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न आहे.
मुंबई, 17 सप्टेंबर: विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) विराट कॅप्टनसी सोडणार आहे. विराटच्या जागी कॅप्टनसीच्या शर्यतीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वात आघाडीवर आहे. त्याचा टी20 फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून रेकॉर्डही चांगला आहे. रोहित टीम इंडियाचा कॅप्टन झाला तर व्हाईस कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न आहे. (फोटो - AFP)
टीम इंडियाच्या टी20 टीमच्या व्हाईस कॅप्टनसाठी 3 जणांमध्ये चुरस आहे. (फोटो – ऋषभ पंत इन्स्टाग्राम)
या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व करणाऱ्या ऋषभ पंतनं त्याची क्षमता सिद्ध केली आहे. दिल्लीची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. दिल्लीनं आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं तर ऋषभ पंत टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन होऊ शकतो. (फोटो- ऋषभ पंत इन्स्टाग्राम)
पंजाब किंग्सचा कॅप्टन केएल राहुल देखील या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. राहुलनं आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचं दाखवून दिलं आहे. राहुल आगामी 4-5 वर्ष तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. (फोटो – AFP)
केएल राहुल आणि ऋषभ पंतसह जसप्रीत बुमराह देखील या शर्यतीमध्ये आहे. बुमराह टीम इंडियातील समजदार खेळाडूंपैकी एक आहे. शांत स्वभाव हे त्याच्या चांगल्या कामगिरीचं कारण आहे. टीममधील खेळाडूंमध्येही बुमराहबद्दल आदर आहे. (फोटो- Virat Kohli Instagram)