25 एप्रिल : मतदान याद्यांतून वगळलेलं मतदार हे सरकारविरोधात असल्याने हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. तसंच या मतदान करू न शकलेल्या मतदारांना फेरमतदान करता यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केलीय.
याबाबत त्यांनी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकार्यांची भेट घेऊन तक्रार केली. तसंच याविरोधात ते कोर्टातही जाणार आहेत. भाजपनही या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. वकील मोहन जयकर हे मतदार याद्यांमधली नावं गहाळ झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
तर औरंगाबादमध्येही फेरमतदान घेण्याची मागणी औरंगाबादचे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी केलीय. दरम्यान, भाजपच्या मतदारांची नावं जाणीवपूर्णक मतदार याद्यांमधून गहाळ करण्यात आली असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलीय. यावेळी त्यांनी हा आरोप केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++