JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मोठी दुर्घटना : तब्बल 38 प्रवाशांच्या बोटीला विजेचा झटका; जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी गंगेत मारल्या उड्या

मोठी दुर्घटना : तब्बल 38 प्रवाशांच्या बोटीला विजेचा झटका; जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी गंगेत मारल्या उड्या

या बोटीतून तब्बल 38 जणं प्रवास करीत होते. विजेचा झटका बसल्यामुळे कित्येक जणं भाजले गेले आहेत. तर 4 जणं अद्याप बेपत्ता आहेत.

0106

बिहारमधून काल रात्री उशिरा एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे रुस्तमपूरच्या दिशेने एक बोट निघाली होती. यातून शेकडो लोक प्रवास करीत होते. मात्र जशी बोट गंगेत पोहोचली तसा बोटीचा हायटेंशन तारेशी संपर्क आला. ज्यात बोटीत बसलेल्यांना धक्का जाणवला. याची सूचना मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफसह पोलिसांनी टीम घटनास्थळी पोहोचली.

जाहिरात
0206

स्थानिक दुसरी बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात बेपत्ता झालेल्यांचाही तपास सुरू आहे.

जाहिरात
0306

घटनेमुळे स्थानिकांमध्ये आक्रोश आहे. या प्रकरणात ते राज्य सरकारला दोषी मानत आहेत. ते म्हणाले की, दियारावासी येथे पक्का पुल नसल्याकारणाने लोक बोटीतून प्रवास करतात.

जाहिरात
0406

या अपघातात अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हायटेंनशनच्या तारेशी संपर्क आल्यामुळे अनेकजणं भाजले आहेत.

जाहिरात
0506

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, 3 जणं बेपत्ता असून काल रात्री एक बोट हायटेंशन तारेच्या संपर्कात आली होती. ज्यामुळे संपूर्ण बोटीत करंट पसरला. या अपघातात 38 जणं जखमी झाले आहे. तर काही जणं जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली. गंगेत उडी मारलेले तिघेजण बेपत्ता आहेत.

जाहिरात
0606

बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लोक पीडित कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप त्यांच्याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या