नवी दिल्ली, 17 जून: सीबीएसई (CBSE Evaluation 2021) 12 वी निकाल प्रकरणी नियुक्त केलेली 13 सदस्यीय समितीनं गुरुवारी सुप्रीम कोर्टाला ( Supreme Court) आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. सादर केलेल्या अहवालानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाचा बाजूनं आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज दिले जाईल. इयत्ता 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल, हे सूत्र निकालाचे असणार आहे. सीबीएसईने स्पष्ट केलं की, बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसंच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.
31 जुलैला निकाल जाहीर होईल. तसंच दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, त्याचप्रमाणे अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुणे घेतले जाईल. दहावीचे 30% गुण, अकरावीच्या गुणातील 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.