07 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सीमेवरचा तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार सुरू अजूनही आहे. जम्मूमधल्या सीमारेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने काल रात्रभरात 4 ठिकाणी जोरदार गोळीबार केला. यात 5 जण ठार झाले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानने जम्मू भागातल्या आर.एस. पुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू ठेवलं आहे. त्यामध्ये त्यांनी सीमाभागात गावातल्या सामान्य नागरिकांची घरं, बीएसएफच्या चौक्या यांना लक्ष्य केलं आहे. रात्रीपासून पाकिस्ताननं बीएसएफच्या 40 चौक्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये पाकिस्तानी रेंजर्सचा सहभाग असल्याचा आरोप बीएसएफनं केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++