JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pradhan Mantri Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांना दिलासा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ही महत्वाची काढली अट

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांना दिलासा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ही महत्वाची काढली अट

राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै : राज्यात सन 2022-23  या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना  (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी तलाठी कार्यालयाचे फेरे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना काही गोष्टी सोप्या जाणार आहेत.

खरीप-2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

हे ही वाचा :  नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? ट्विट करत दिपाली सय्यद यांनी मानले भाजपचे आभार

संबंधित बातम्या

पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी  पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहित धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.  

जाहिरात

त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

हे ही वाचा :  …हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर, टाळेबंदीचा डाव, शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

जाहिरात

ई-पिक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केल्यास आपत्तीच्या काळात याचा अधिक फायदा होणार आहे. आपत्तीमुळे होणारे नुकसान याची आकडेवारी निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे मदत देणे ही सोईचे होईल. तसेच शेतकऱ्यांना विमा, नुकसान भरपाई देणे शासनाला सोयीचे होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी करुन सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या